हॉटेल रूम मध्ये घडलेल्या ‘ह्या’ एका चुकीमुळे ऐश्वर्याला कायमचा गमावून बसला हा अभिनेता..

‘ऐश्वर्या राय’ नाव ऐकूनच अजूनही सर्वांच्या डोळ्यासमोर एक स्वप्न सुंदरी तरळते ना.. भारतातच नाही तर आज अख्ख्या जगात ऐश्वर्या राय हे एक मोठे नाव आहे. 1994 मध्ये विश्व सुंदरीचा खिताब जिंकणारी ऐश्वर्या सर्वांनाच हवीहवीशी होती. पण अखेर तिने अभिषेक बच्चनशी लग्न केले आणि बच्चन कुटुंबाची सून झाली.

पण तुम्हाला माहिती आहे काय बॉलीवूडमध्ये असे दोन अभिनेते होते जे ऐश्वर्यावर जीवापाड प्रेम करत होते. त्यापैकी एकाचे लग्न ऐश्वर्याशी होणारच होते पण त्याच्या एका चुकीमुळे होत्याचं नव्हतं झालं. तुम्हाला आतापर्यंत समजलं असेलच की इथे आपण ऐश्वर्याच्या दोन प्रेमी सलमान खान आणि विवेक ओबेरॉय विषयी बोलत आहोत. आज आम्ही तुम्हाला सांगू की सलमान आणि विवेकच्या चुकांमुळे ऐश्वर्या त्यांची पत्नी कशी होऊ शकली नाही.

हे खूप कमी लोकांना माहीत आहे की ऐश्वर्या आधी मॉडेल राजीव मूलचंदानी यांना डेट करत असे. ऐश्वर्या देखील त्या दिवसात मॉडेलिंगच करायची. अशा परिस्थितीत हे दोघे एकमेकांच्या जवळ आले होते. नंतर मात्र ऐश्वर्या चित्रपट सृष्टी कडे वळली. आणि राजीव मॉडेलिंग क्षेत्रातच होता. दोघांचे मार्ग बदलल्याने त्यांनी एकमेकांपासून वेगळे व्हायचा निर्णय घेतला.

ऐश्वर्याने बॉलिवूड मध्ये पदार्पण केले आणि तरुणांच्या डिलांची धडकन झाली. यानंतर ऐश्वर्या सलमान खानला ‘हम दिल दे चुके सनम’ च्या सेटवर भेटली. इथे दोघे एकमेकांच्या प्रेमात आले. सलमान आणि ऐश्वर्याने 1999 ते 2001 या काळात एकमेकांना डेट केले. पण त्यानंतर यादरम्यान सलमानने अशी चूक केली की या दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला.

खरं तर ऐश्वर्याशी रिलेशनशिपमध्ये असताना सलमानने आणखी दुसर्‍या एका मुलीबरोबर रिलेशनशिप ठेवले होते. या प्रकरणात सलमानच्या फसवणूकीवर चिडलेल्या ऐश्वर्याला सलमानपासून अंतर ठेवणे योग्य वाटले त्यामुळे तिने सलमानपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

परंतु सलमान मात्र ऐश्वर्याच्या प्रेमात पूर्ण वेडा झाला होता.सलमानला ही गोष्ट अजिबात पटली नाही आणि त्याचा राग तो नियंत्रित करू शकला नाही. जेव्हा जेव्हा ऐश्वर्या चित्रपटांचे शूटिंग करायची तेव्हा सलमान तिथे पोहोचुन धिंगाणा घालायचा .

सलमानपासून दूर झाल्यानंतर ऐश्वर्याच्या आयुष्यात विवेक ओबेरॉय ची एन्ट्री झाली. सलमानसोबत प्रेमात फसवणूक झाल्यानंतर विवेक सोबत ऐश्वर्या प्रेमात पडली. दोघांनी मिळून ‘क्यों हो गया ना’ हा चित्रपट देखील केला. या चित्रपटादरम्यान दोघे एकमेकांचे खूप जवळ आले.

अशा परिस्थितीत जेव्हा ऐश्वर्याचा 30 वा वाढदिवस आला तेव्हा विवेकने तिला एकाच वेळी 30 गिफ्ट देऊन तिला प्रभावित केले. मात्र, ऐश्वर्याने विवेक आणि त्याच्या नात्याबद्दल खुलेपणाने कोणालाही सांगितले नाही. पण त्या दिवसांत ती विवेकबरोबर प्रत्येक फंक्शनमध्ये दिसली होती. दोघांनी कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी सर्वच सिने रसिकांना त्यांचे हे प्रकरण माहीत झालं होतं.

ऐश्वर्याला वाईट काळातून बाहेर काढण्यासाठी मदत करावीशी वाटली, म्हणून विवेकने एका हॉटेलच्या खोलीत प्रेसच्या लोकांना बोलावले आणि सर्वांना सांगितले की, सलमानकडून त्याला जिवे मारण्याची धमकी दिली जात आहे. परंतु विवेकची ही युक्ती त्याला चांगलीच महागात पडली.

विवेकच्या या हालचालीने ऐश्वर्याने त्याच्यापासून वेगळे होण्यास सुरवात केली. अशा प्रकारे ऐश्वर्या रायने विवेकचा हात सोडला. इतकेच नव्हे तर विवेक आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात होता, परंतु आपल्या सलमान सोबत पेच पडल्यामुळे बरेच चित्रपट त्याच्या हातातून गेले. त्यादिवशी विवेकने ही पावले उचलली नसती तर कदाचित त्यांच्याकडे ऐश्वर्या आणि चांगली चित्रपट कारकीर्द दोन्ही असू शकले असते.

Leave a Reply

Your email address will not be published.