बॉलिवूड जगतामध्ये आजच्या घडीला सर्वाधिक चर्चेत असलेले जोडपे म्हणजे अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा. होय कारण प्रत्येकाला त्यांच्या प्रेम प्रकरणाचाबद्दल माहित झाले आहे आणि जेव्हापासून मलायका अरोराने अरबाजशी घटस्फोट घेतल्यानंतर मलायका बर्याच ठिकाणी अर्जुनबरोबर दिसली होती, त्यानंतर या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी आहे याची चर्चा सुरू झाली. या प्रकरणामुळे हे दोघेही चर्चेत आहेत.
2 वर्षांपूर्वी हे दोघेही मुकेश अंबानीचा मोठा मुलगा आकाश अंबानी आणि श्लोका मेहताच्या रिसेप्शनमध्ये पहिल्यांदा एकत्र दिसले होते. तेव्हापासून या दोघांच्या रिलेशनशिप बद्दल मीडियामध्ये खबर पसरली. मलायका ने अरबाज ला घट-स्फो-ट दिल्यानंतर काही दिवसातच हे घडले होते.
इतकेच नाही तर बर्याच दिवसांपासून अशी बातमीही येत आहे की अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा एप्रिलमध्ये ख्रिश्चन पद्धतीने लग्न करणार आहेत. आधी तर दोघांनीही या गोष्टीवर बरेच दिवस मौन बाळगले होते. परंतु आता जेव्हा मलायकाला लग्नाबद्दल विचारण्यात आले तेव्हा ती तिच्या लग्नावर उघडपणे बोलली,
तिने या सगळ्या गोष्टींचा वास्तवाशी काहीही सं-बं-ध नसल्याचे सांगितले.. दोघेही एकमेकांवर प्रेम तर करतात परंतु लग्नाचा अजूनही विचार केलेला नाहीये. अर्जुन वयाने खूप छोटा असल्यामुळे हे प्रकरण पुढे जात नसल्याचे तिने स्पष्ट केले. दोघांच्या वयात 10हुन अधिक वर्षांचे अंतर आहे.
त्यासोबतच तिने अर्जुन कपूरसोबत अजिबात ख्रिश्चन पध्दतीने लग्न करणार नसल्याचे सांगितले. इतकेच नव्हे तर नुकत्याच झालेल्या अर्जुन कपूरसोबत चर्चच्या लग्नाच्या खबरीबाबत मुलाखत देताना मलायका म्हणाली की या सर्व बातम्या माध्यमांनी घडवल्या आहेत, त्यात काही तथ्य नाही.
मलाइका असेही म्हणाली की प्रत्येकाला रिलेशनशिपमध्ये रहायला आवडतं. घट-स्फो-टाच्या नंतरही तिला आयुष्यात एकटे राहायचे नाही असे तिने ठरवले आहे. या व्यतिरिक्त ती पुढे म्हणाली की, “लग्नाच्या इतक्या वर्षानंतर घ-ट-स्फो-ट घेऊ नये असा सल्ला मला अनेकांनी दिला होता, परंतु मी घेतलेला निर्णय योग्य होता असे मला वाटते.
‘या व्यतिरिक्त प्रत्येकाला आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट विसरून पुढे जायचे आहे. ते लोक भाग्यवान आहेत, ज्यांना आयुष्यात प्रेम करण्याची दुसरी संधी मिळते. खरं तर अनुपमा चोप्राच्या एका इव्हेंट शो दरम्यान मलायकाला अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपच्या बातम्यांबाबत प्रश्न विचारण्यात आले होते आणि ती म्हणाली की हे सर्व माध्यमांनी बनवलेल्या अ-फ-वा आहेत.
मलायका पुढे असंही म्हणाली की मला वाटते प्रत्येकाला मूव्ह ऑन व्हायचे आहे आणि असा भागीदार पाहिजे आहे, ज्याच्याशी तो सर्व काही करू शकेल. प्रत्येकजण अशा जोडीदाराच्या शोधात असतो. असा जोडीदार मिळणे प्रत्येकाच्या नशिबात नसते. जर तुम्हाला असा जोडीदार मिळत असेल तर मला असे वाटते की आपण भाग्यवान आहात की तुम्हाला जीवनात आनंदी होण्याची दुसरी संधी मिळाली. .
याशिवाय नुकत्याच झालेल्या करीना कपूर खान सोबतच्या रेडिओ कार्यक्रमात मलायका अरोरा तिच्या घट-स्फो-टाविषयी मोकळेपणाने बोलली. घट-स्फो-टाच्या आदल्या रात्री संपूर्ण कुटुंब एकत्र बसून त्यांनी चर्चा केली असल्याचे तिने सांगितले होते. प्रत्येकाने तीला विचारले की आपल्या निर्णयाबद्दल तिला 100 टक्के खात्री आहे का? मलायकाने हो उत्तर दिल्यावर सर्वांनी तिच्या निर्णयाचे समर्थन केले.