हिंदी सिनेमा च्या जगात असे अनेक नामांकित तारे आहेत ज्यांनी आपले जीवनसाथी इंडस्ट्री माधिलच निवडले आणि सात जन्म एकमेकाबरोबर राहण्याची शपथ ही घेतली आहे. तथापि, या तारेंपैकी काहीे असे आहेत ज्यांनी आधिचे लग्न मोडले आणि दुसरे लग्न केले,आणि असेही काही लोक आहेत ज्यांचे लग्न झाल्यावर ते दुसर्या मुलीच्या प्रेमात पडले आणि मुले असूनही पहिल्या पत्नी ला सोडले आहे. त्यामुळे त्यांच्या दुसऱ्या पत्नीला आपत्य होऊ शकले नाही. तथापि, काही अभिनेत्री वैद्यकीय कार्णामुळे आई बनू शकल्या नाही.आज आम्ही तुम्हाला 8 बॉलिवूड सेलिब्रिटी जोडप्यांविषयी सांगणार आहोत. ज्यांला मूल नाही…
दिलीप कुमार-सायरा बानो-50 आणि 60 च्या दशकात दिलीप कुमार बॉलीवूडमधील मोस्ट एलिजिबल बैचलर्सं पैकी एक होता. सुरुवातीला तो मधुबालासोबत होता, परंतु मधुबालाशी ब्रेकअप झाल्यानंतर त्याची भेट सायरा बानोशी झाली.त्यावेळी सायरा बानो बॉलिवूड मधे नवीन होती.सायरा बानूने वयाची पर्वा न करता तिच्या पेक्षा 22 वर्षांनी वायस्कर असलेला दिलीप कुमारशी लग्न केले.जेव्हा सायराने मूलासाठी प्रयत्न केले, तेव्हा तीचा गर्भपात झाला होता आणि ती आई होऊ शकली नाही.
मीना कुमारी-कमल अमरोही– प्रसिद्ध दिग्दर्शक कमल अमरोही आणि रुपेरी पडद्यावरील शोकांतिकेची राणी मीना कुमारी या दोघांची प्रेम कहाणी बॉलिवूड कॉरिडोरमध्ये खुप प्रसिद्ध झाली होती. ते सेटवर भेटले आणि येथूनच प्रेम वाढू लागले. त्यांच्या नात्यात 15 वर्षांचा फरक होता कारण कमल हा मीनापेक्षा 15 वर्षांनी मोठा होता आणि विवाहित होता.कमल अमरोही ला पहिल्या लग्नापासून मुले ही होते. असे म्हणतात की, लग्नानंतर मुले जन्माला येणार नाहीत या अटीवरच कमलने मीना कुमारीशी लग्न केले होते. लग्नानंतर दोघांमध्ये तणाव वाढू लागला आणि एक वेळ अशी आली की ती एकाकीपणात राहू लागली.मीना कुमारी यांचे 1972 मध्ये लिवर सोरायसिसमुळे निधन झाले.
साधना-आर के नैय्यर-बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडप्यांच्या यादीत-साधना शिवदासानी आणि आर के नय्यर यांचे देखिल नाव आहे, हे त्यांच्या काळातील खूप प्रसिद्ध रोमँटिक जोडपे होते. दोघांनी 1966 मध्ये लग्न केले होते आणि हिंदी चित्रपटात साधना हे नाव,त्या काळी खुप मोठे होते आणि नैय्यर साहेब हे इंडस्ट्रीचे प्रसिद्ध दिग्दर्शक होते. दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते पण काही कारणांमुळे साधनाला आपत्य हौउ शकले नाही.
आशा भोसले-आरडी बर्मन– सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले आणि संगीत दिग्दर्शक आरडी बर्मन यांनाही मुले नाहीत.तथापि आशाचे पहिले लग्न गणपतराव भोसले यांच्याशी झाले होते. या लग्नापासून त्यांना 3 मुले आहेत. पण लग्नाच्या 11 वर्षानंतर दोघे वेगळे झाले आणि 1980 मध्ये आशाजींनी आरडी बर्मनशी लग्न केले. पण त्यांना मुल झाल नाही.
मधुबाला – किशोर कुमार – बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक असलेल्या मधुबालाचे अनेक दीवाने होते. प्रत्येकजण तिच्या सौंदर्यावर मरत असे. तर किशोर कुमार देखील सर्वांनाच प्रिय होते. दोघांनी 1960 मध्ये लग्न केले होते. दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. मधुबाला चे हे किशोर दा सोबतचे दुसरे लग्न होते आणि पहिल्या लग्नापासून तिला एक मुलगा होता. किशोर दाचे मधुबालाशी लग्न झाले होते, काही काळानंतर तिला हृदयविकाराचा त्रास झाला आणि डॉक्टरांनी तिला गर्भधारणा न करण्याचा सल्ला दिला. 1969 मध्ये मधुबाला चे निधन झाले.
शबाना आझमी-जावेद अख्तर-संपूर्ण इंडस्ट्रीला जावेद अख्तर आणि शबाना आझमीची प्रेमकथा माहित आहे. तसे, जावेदने 1972 मध्ये अभिनेत्री हनी इराणीशी प्रथम लग्न केले होते.ज्यांच्या पासुन फरहान आणि झोया अशी दोन मुलं होती. जावेद शबानाच्या प्रेमात पडला आणि ति च्या शी लग्न केले. पण त्यांना मूल झाले नाही. तथापि, शबाना,जावेदच्या दोन्ही मुलांना आपले मानते आणि त्यांच्या वर आई प्रमाने प्रेम करते.
अनुपम खेर-किरण खेर- अनुपम खेर आणि किरणची पहिल्यांदा 80 च्या दशकात चंदीगडमध्ये भेट झाली. त्यावेळी किरणचे लग्न झाले होते आणि ती एका मुलाची आई होती. पण तिचा, तिच्या पतीशी मतभेद असायचा. या दरम्यान, तिचे हृदय अनुपमवर आले आणि अनुपम खेर आणि किरन या दोघांचे लग्न झाले, त्यानंतर दोघे मुंबईत आले. असे म्हणतात की दोघांनाही मुले हवी होती परंतु वैद्यकीय परिस्थितीमुळे त्यांनी मुले न होण्याचा निर्णय घेतला.त्यानंतर अनुपम खेर यांनी किरणचा मुलगा सिकंदर ला त्याचे आडनाव दिले.
संगीता बिजलानी – मोहम्मद अझरुद्दीन – एकेकाळी सलमान खानबरोबर मुख्य बातमी ठरलेल्या संगीता बिजलानीचे लग्न टीम इंडियाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनशी झाले होते. संगीता एक मॉडेल आणि अभिनेत्री होती.संगिता बिजलानी आणि मोहम्मद अजहरुद्दीन दोघे 90 च्या दशकात भेटले, आणि अझरुद्दीनने आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला आणि 1996 मध्ये संगीताशी लग्न केले. अझरला पहिल्या पत्नीपासून दोन मुले आहेत पण संगीताला स्वत: ची मुले नाहीत.