या 5 दिग्गज बॉलिवूड अभिनेत्यांनी केले आहे घटस्फो-टीत महिलेंसोबत लग्न!!

बॉलिवूड स्टार्स समाजातील बंधने तोडण्यासाठी आणि समाजात नवीन नियम आणण्यासाठी ओळखले जातात. बॉलिवूड चित्रपटांनी भारतात प्रचलित बर्‍याच बंधनांचा नाश केला आहे. त्याचप्रमाणे बॉलिवूड चित्रपटांचा बर्‍याच लोकांचा प्रभाव आहे आणि त्यांच्या आयुष्यात चित्रपटातून प्रेरणा घेऊन ते पुढे गेले आहेत. समाजात होणारे बदल आणि विचारांमधील मोकळेपणा हे सर्व बॉलिवूडमुळे घडले असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

बॉलिवूड सेलिब्रिटींनी मोडलेले असे अनेक बंधने समोर आले आहेत. मग ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये रहाने असो किंवा कमी कपडे घालणे. बॉलिवूडने जीवनशैली बदलली आहे. त्याचबरोबर बॉलिवूडने प्रेमाची व्याख्या बदललीही आहे.

चित्रपटसृष्टीतील असे बरेच कलाकार आहेत जे आपल्या अनोख्या प्रेम प्रकरणांसाठी ओळखले जातात. बॉलिवूडच्या बऱ्याच अभिनेत्रींनी घटस्फो-टित पुरुषांशी लग्न केले आहे. पण तुम्हाला माहित आहे का की बॉलीवूडचे असेही अभिनेते आहेत ज्यांनी घटस्फो-टित महिलांशी लग्न केले आहे. या यादीमध्ये बरीच मोठी नावे आहेत.

संजय दत्त आणि मान्यता दत्त- या यादीतील पहिले सर्वात मोठे नाव संजय दत्त यांचे आहे. संजू बाबा यांचे नाव अनेक अभिनेत्रींशी संबंधित होते, परंतु संजय दत्तने मान्यता दत्तशी लग्न केले. मानयताचे आधी लग्न झाले आहे. तिच्या पहिल्या पतीचे नाव मिराज-उर-रहमान आहे.

मानयताचा पती मिरज याने त्यांचे लग्न बेकायदेशीर ठरवत दोघांनाही कोर्टात ओढले. मिरज सांगतो की त्याने अद्याप मान्यताला घटस्फो-ट दिला नाही. तथापि, कोर्टाने मिरजची याचिका फेटाळली आणि संजय दत्त आणि मान्यतेचे हे लग्न मान्य केले.

मिथुन चक्रवर्ती आणि योगिता बाली – डिस्को डान्सर म्हणून लोकप्रिय मिथुन चक्रवर्ती कोणास ठाऊक नाही? घटस्फो टित महिलेशी विवाह करणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीतही त्यांचेही नाव आहे. मिथुनने योगिता बालीशी लग्न केले आहे.

योगिता बाली बॉलिवूडची सदाहरित गायक किशोर कुमारची तिसरी पत्नी होती. योगिता बाली आणि किशोर कुमार यांचे 1976 मध्ये लग्न झाले होते पण 1978 मध्ये हे जोडपे वेगळे झाले. त्यानंतर मिथुनने 1979 मध्ये योगिताशी लग्न केले. मिथुन आणि योगिताची सध्या चार मुले आहेत.

अनुपम खेर आणि किरण खेर- बॉलिवूडची बबली जोडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जोडीची कहाणीही काहीशी अशीच आहे. वास्तविक अभिनेता अनुपम खेरने घटस्फो-टित किरण खेरशी लग्न केले आहे. किरणचे प्रथम लग्न मुंबईतील व्यावसायक गौतम बेरीशी झाले होते, परंतु 1985 मध्ये दोघांनी घटस्फो-ट घेतला.

त्याच वर्षी अनुपम खेरने किरण खेरशी लग्न केले. अनुपम खेर आणि किरण खेर थिएटरच्या दिवसांपासून एकमेकांना ओळखत असत. लग्नानंतर अनुपमने किरणच्या पहिल्या लग्नात जन्म झालेल्या अलेक्झांडर मुलाला दत्तक घेतले.

समीर सोनी- समीर सोनीने आपले पहिले लग्न प्रसिद्ध भारतीय मॉडेल राजलक्ष्मी खडविलकर यांच्याशी केले. समीरचे पहिले लग्न 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकले नाही. यानंतर समीरने ज्या महिलेशी लग्न केले ति घटस्फो-टीत होती.

नीलम कोठारी असे तीचे नाव आहे.नीलम कोठारी बॉलिवूडमध्ये खूप मोठी अभिनेत्री आहे. नीलमचे पहिले लग्न ब्रिटिश व्यावसायक ऋषी सेठियाशी झाले होते. या दोघांनी लग्नाच्या वर्षानंतर अहाना नावाच्या मुलीला दत्तक घेतले.

गुलजार आणि राखी- बॉलिवूडमधील प्रसिद्ध गीतकार गुलजार यांनीही घटस्फो-टित अभिनेत्री राखीशी लग्न केले. राखीने अजय बिस्वास नावाच्या बंगाली चित्रपटाच्या दिग्दर्शकाशी लग्न केले होते. मात्र, गुलजार आणि राखीचे नाते लग्नानंतर फक्त एक वर्ष टिकले.

त्यांनी कधीही घटस्फो-ट घेतला नाही परंतु दोघे एकमेकांपासून विभक्त झाले. त्यांच्या वेगळे होण्याचे कारण म्हणजे यश चोप्राच्या ‘कभी कभी’ या चित्रपटाची सही राखून ठेवणे. राखीने गुलजार यांना याबाबत माहिती दिली नव्हती. सध्या राखी आणि गुलजार यांना मेघना गुलजार नावाची एक मुलगी आहे. आज ती बॉलिवूडमध्ये खूप मोठी दिग्दर्शक आहे.

आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.

Leave a Reply

Your email address will not be published.